श्रेष्ठ कोण, कर्म की नशीब।
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, श्रेष्ठ कोण, कर्म की नशीब। माझ्या मते, कर्म आणि नशीब एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। नशीब बदलता येत नाही, हे खरे, पण कर्मामुळे नशीब घडवता येते। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, आता प्रश्न उपस्थित होतो, कसे, या प्रश्नाच्या उत्तराआधी आपल्याला कर्म सिद्धांत आणि नशीब दोन्ही समजून घेणे आवश्यक आहे। भारतीय परंपरेत अशी धारणा आहे की, मनुष्य कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहे, परंतु त्याच्या कर्माचे फळ त्याला स्वतला भोगावे लागते। वैदिक काळापासून हे चालत आलेले आहे की, चांगले कर्म करणायास सदगति मिळते, तर वाईट कर्म करणा याची दुर्गती होते। पुराणे आणि गंत्रही यावर विस्तृत माहिती दिली आहे की, कोणता यज्ञ केल्याने फळ कसे प्राप्त होते। यासंदर्भात ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की, वरील समजुतीनुसार व्यक्ती कर्म करण्यास मुख्त्यार आहे। परंतु कर्म फळ वेगवेगळे नाही, कर्म फळ तर केलेल्या कर्माचा अपरिहार्य परिणाम आहे। कर्मानुसारच त्याचे फळ मिळते, चांगल्या कर्माचे चांगले, तर वाईट कर्माचे वाईट फळ मिळते, परंतु कर्माचे फळ तर मिळणारच। कर्म फळ संबंध नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। ज्या प्रकारे भौतिक जग कार्यकारणभावाने बांधले गेले आहे, त्याच प्रकारे नैतिक जगत कर्म फल संबंधाने बांधले गेले आहे। यालाच कर्मवादाचा सिद्धांत किंवा कर्मगती, असे म्हटले जाते। सूरदास, मीरा, कबीर, तुलसी आदी संतकवींनी या धारणेचा सुस्पष्ट रूपात उल्लेख केला आहे की, कर्मगति टारे नही टरै। जो जस करै, सो फल चाखा नैतिकतेच्या दृष्टीने कर्म फल संबंध दृढ असावेत म्हणजेच, कर्मानुसारच फळ मिळावे। त्यामुळे कर्म कधी विनाफळ राहत नाही, शुभ अशुभ, दोन्ही कर्मांची फळे मग ती शुभ असो की अशुभ, दोन्ही कर्मांची फळे व्यक्तीला भोगावीच लागतात। आता प्रत्यक्षात कर्म सिद्धांत म्हणजे काय, व्यक्ती कर्म करण्यास स्वतंत्र आहे का। अथवा त्याच्या द्वारे केली गेलेली सर्व कर्मे ईश्वर किंवा, अन्य अदृश्य शक्तीकडून पूर्वनिर्धारित आहेत काय। या संबंधात माझ्या मते व्यक्ती कर्म करण्यास स्वतंत्र आहे। कारण जर व्यक्ती कर्म करण्यास स्वतंत्र नसेल तर त्याला कोणत्याही कर्मासाठी जबाबदार धरता येणार नाही। कर्म स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्वात अनिवार्य संबंध आहे। जर एखादी व्यक्ती मजबुरीने कोणते कर्म करते तर, त्याला त्या कर्मासाठी जबाबदार धरता येणार नाही। हे सांगण्याचे तात्पर्य असे की, त्याला त्या कर्मासाठी दंड ठोठावता येत नाही किंवा, शाबासकीही देता येत नाही। हे तर सर्वश्रुत आहे की, कर्माचे फळ त्याच्या कर्त्यास मिळते। कर्माची अवस्था आणि फळाची अवस्था एकाच वेळी मिळत नाही। कधी कधी दोहोत खूप अंतर असते, तर कधी थोड्या वेळाचे अंतर असते। पण, काहीना काही वेळ तर लागतोच। जर कर्मावस्थेत कर्ता आणि फळावस्थेत भोक्त्याहून, वेगळा असेल तर कर्म करणा यास त्याचे फळ मिळत नाही। कर्माचे फळ कर्माच्या कर्त्यास मिळालेच पाहिजे। अन्यथा कर्मफळांचा संबंध निरर्थक ठरेल। तरीसुद्धा, कर्मावस्थेत कर्ता आणि फळावस्थेत भोक्ता दोन्ही प्रत्यक्षात एकच व्यक्ती असते, हे मानावेच लागते। आत्मा हाच कर्ता आहे, नित्य आहे. तो परिवर्तनशील नाही। जर कर्माचा कर्ता फळाच्या वेळी बदलला तर फळाचा भोक्ता कोण असेल, अशा परिस्थितीत दोन प्रकारचे दोष असण्याची शक्यता आहे, कृत प्रणाश, केलेल्या कर्माचा नाश, अकृताभ्युगम, अकृत कर्माचे फळ। सांगण्याचे तात्पर्य असे की, कर्माच्या फळाचा नाश होत नाही आणि अकृत कर्माचे फळही मिळत नाही। कर्म आणि फळाचा व्यवच्छेदक संबंध आहे। आपल्या सध्याचे आयुष्य म्हणजे गेल्या, जन्मातील फळे असतात आणि यानंतर मिळणा या जन्मास, वर्तमान जन्माचे प्रतिफळ समजावे। जे कर्म स्वइच्छेने केले जाते, त्याचे फळ कर्त्यास मिळते। जर कोणी चोरी करू इच्छित नसेल तर काही लोक त्याला, चोरी करण्यास मजबूर करतात। तर त्याला त्या चोरीचे फळ मिळणार नाही। व्यवहारात कधी कधी कर्म आणि फळाच्या संबंधात परस्परविरोध दिसून येतो। शुभ कर्म करणा याच्या नशिबी दुख येते आणि अशुभ कर्म करणारा माणूस सुख उपभोगतो। वास्तविक पाहता, कर्मासंबंधात असा विरोधाभास नाही। कर्माचे तीन प्रकार आहेत। प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि संचयीमान कर्म। प्रारब्ध कर्म भूत जन्माचे कर्म आहे। त्याचे फळ वर्तमानात मिळते आहे। संचितकर्म म्हणजे, ज्याचे फळ तेव्हा मिळेल, जेव्हा प्रारब्ध कर्माचे फळ समाप्त होईल। संचयीमान कर्म वर्तमान जीवनातील कर्म आहे, याचे फळ भोगण्याची अजून प्रतीक्षा आहे। फळ भोगात तारतम्यता आहे, नशिबानंतर संचित किंवा संचितानंतर संचयीमान कर्माची फळे भोगावे लागतात। याला कारण वर्तमान जीवनात शुभ कर्म करणारा व्यक्ती दुख सोसत असतो। हे दुख त्याच्या पूर्वजन्मी केलेल्या अशुभ कर्माचे फळ आहे। कर्म फळ संबंध कर्त्याच्या इच्छेवर अवलंबून नाही। इच्छा असूनही त्याला वर्तमान शुभ कर्माचे सुखद फळ त्याला पूर्वजन्माची फळे भोगल्याशिवाय प्राप्त होणार नाही। क्रियमाण कर्माचे फळ अजून मिळालेले नाही, पण जरूर मिळेल। मग मृत्यूनंतर पुनर्जन्मात का असेना, पण त्याला ते मिळेल। जर अशुभ कर्म करणारा सुख भोगत असेल तर आणि शुभ कार्य करणारा, दुख भोगत असेल तर पहिल्या व्यक्तीचे नशीब चांगले आणि दुस याचे वाईट, अशी आमची समजूत अधिक दृढ होईल। यावरून हे तर स्पष्ट होते की, जो व्यक्ती जसे कर्म करतो तसेच फळ त्याला मिळते। अर्थात कर्माचे स्वरूप त्या व्यक्तीचे नशीब घडवते। उदाहरणार्थ, जर एखादा व्यक्ती सदाचरण करत असेल तर त्याच्या फळस्वरूप सुख त्याचे नशीब बनते। याच प्रकारे त्याच्याकडून वर्तमान जीवनात केले गेलेले, सदाचरण त्याच्या भावी सुखी जीवनाचे आधार बनते। अशा प्रकारे व्यक्ती कर्म करण्यास स्वतंत्र आहे, मग तो सत्कर्म करो की दुष्कर्म, परंतु त्याच्या दोन्हीचे परिणाम ठरलेले आहेत। त्यावर व्यक्तीचे नियंत्रण नसते, सत्कर्माचे फळ चांगले आणि दुष्कर्माचे फळ वाईटच मिळेल। भगवद्गीता हेच स्पष्ट केलेले आहे। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। शेवटी असे म्हटले जाऊ शकते की, कर्मच श्रेष्ठ आहे। कर्मच कर्तव्य आहे, कर्मच ईश्वर आहे, तसेच कर्मच पूजा आहे। व्यक्ती स्वत आपले भाग्य घडवतो। नशीब बदलता येत नसले तरी कर्मापासून नशीब घडवले जाऊ शकते। तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.

Comments
Post a Comment