कर्माची फळे भोगावी लागतात



नमस्कार मित्रांनो, मराठी club channel वरती आपले स्वागत आहे.  आपन जसे कर्म करतो त्याची फळे कशी मिळतात.  प्रारब्ध भोग कश्याला मानतात, त्याची फळे कशी मिळतात.  मित्रांनो, हे video खूप ज्ञानवर्धक, आणि तुमच्या जीवनात उपयोगी होणारे आहे.  तर हे video शेवट पर्यंत ऐका, आणि कमेंट मधे खऱ्या मनाने जय श्री कृष्ण नक्की लिहा.  मित्रांनो, प्रारब्ध भोग काय आहे, कर्मविपाक म्हणजे तुम्ही केलेल्या कृत्यांची, कर्मांची फळे, ही तुम्हाला भोगावीच लागतात. उदारनार्थ, मी चोरी केली मला पकडले, व त्या बद्दल शिक्षा झाली, मला कर्माचे फळ मिळाले, संपले. पण मी या जन्मात सापडलो नाही, मेलो. तरी ते फळ चुकत नाही. मला पुढील जन्मात त्याचे फळ भोगावे लागते. त्यातून सुटका नाही. प्रत्यक्ष परमेश्वरही त्यात ढवळाढवळ करत नाही. याचा अर्थ तुमचा पुनर्जन्म होतो, कारण हिशोब चुकता केल्याशिवाय तुमची सुटका नाही. चांगल्या कर्माची शुभ फळे, व वाईट कर्माची अशुभ.  कर्माच्या जातीप्रमाणे फळाची जात, हा झाला सिद्धांत. पण या मध्ये बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात.  म्हणून काही जास्त कलमे उपकलमे जोडली आहेत, ती बघू. काही कर्मे मागील जन्मातील असतात. त्यांची फळे अजून भोगावयास सुरवात करावयाची असते. त्या पैकी काहींची सुरवात सुरू झालेली असते, काही चालू जन्मातील असतात. यांना निरनिराळी नावे दिली आहेत. यातील काही स्पष्ट अर्थ माहीत नसला तरी, गोळाबेरिज अर्थ व्यवहारात नेहमी वापरले जातात. एक आहे संचित कर्म, कोण्याही मनुष्याने सांप्रतच्या क्षणापर्यंत केलेले कर्म म्हणजे संचित.  ते मागच्या जन्मातील व या जन्मातील केलेया कर्मांची बेरीज.  याला अदृष्ट किंवा अपूर्व असेही म्हणतात. अदृष्ट म्हणावयाचे कारण, करतेवेळी कर्म दृश्य असते, पण नंतर ते केवळ परिणाम रूपाने शिल्लक राहते. दुसरं आहे प्रारब्ध कर्म. संचित कर्मांची फळे एकदम भोगता येत नाहीत, ती परस्पर विरोधीही असतात.  बरीवाईट फळे एकाचवेळी कशी भोगणार ?  जी कर्मे फलोन्मुख झालेली असतात, म्हणजे ज्यांची फळे मिळावयास सुरवात झालेली असते, त्यांना प्रारब्ध म्हणतात.  तिसरे आहे क्रियमाण कर्म.  प्रारब्ध भोगत असतांना, तुम्ही या जन्मीही कर्मे करत असताच.  अशा कर्मांना क्रियमाण वा वर्तमान कर्मे म्हणतात.  वर सांगितल्याप्रमाणे या कर्माचे फळ तात्काळ मिळाले तर भो्ग तेथेच संपतो.  पण तसे झाले नाही तर, पुढी्ल जन्माकरिता तो तुमच्या खात्यात जमा होतो. असा हा चक्रव्युह आहे.  मागील जन्मांची फळे आज भोगा, व या जन्माची फळे भोगावयास पुढचा जन्म घ्या.  यातून सुटका कधीच नाही कां ? नसेल तर सगळेच निरर्थक ठरेल.  सुटकेचा मार्ग आहे.  कर्म करूच नका, फळ नाही, पुनर्जन्म नाही.  अर्जुनाने हाच मुद्दा मांडला.  भगवान म्हणाले, मुर्ख आहेस.  कर्मे चुकत नाहीत, जगतो आहेस तोवर कर्मे करावीच लागतात. हा ही मार्ग खुंटल्यावर भगवान दिलासा देतात.  तेच गीतेचे मर्म म्हणावयास हरकत नाही.  फळे कर्म केले म्हणून मिळत नाहीत, त्या कर्मामागे तुमची जी वासना आहे, कामना आहे, त्यामुळे फळे मिळतात.  कामना नसेल तर कर्म करूनही फळ मिळणार नाही.  तेव्हा भगवंतांचे सांगणे असे की निष्काम बुद्धीने, फळे मला अर्पण करून युद्ध कर, या कर्माची बरीवाईट फळे तुला भोगावी लागणार नाहीत.  परमेश्वराने एकदा ही सृष्टी निर्माण केली, व त्याचे नियम लागू केले की, मग तो यात ढवळाढवळ करत नाही.  विस्तवाने हात भाजतो हा नियम. मग तो सर्वांना सर्वकाळ लागू होतो.  दुर्जनांना तसेच सज्जनांनाही, तसेच एकदा तुम्हाला बुद्धीस्वातंत्र्य दिले की ते कसे वापरावे ही तुमची जबाबदारी.  तुम्ही ती चुकीच्या मार्गाने वापरली व त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागले, तर मग ईश्वराला दोष देणे बरोबर नाही.  कर्माचे फळ नेमून दिले की मग तो उदासिन राहतो. त्याला विषमता व निर्दयता हे दोष लागत नाहीत.  पेरलेलेच उगवते व पेराल तेच उगवेल हा सृष्टीनियम असल्याने, तुम्ही आपल्या विपदांबद्दल ईश्वराला जबाबदार धरू शकत नाही.  तुमची फळे तुम्हालाच भोगावयाची असतात.  ती दुसर्‍याला देता येत नाहीत व दुस‍याला ती घेता येत नाहीत.  एका दुष्कृत्याचे फळ दुसर्‍या सत्कृत्याने नाहीसे होत नाही.  सत्कृत्याचे फळ मिळेल पण दुष्कृत्याचे भोगावेच लागेल.  कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य यांचा संबंध असा की, या स्वातंत्र्याने आज फक्त सत्कृत्ये करा व पुढील जन्म सुखात घालवा.   त्याच वेळी मागील दुष्कृत्यांची, प्रारब्धाची फळे भोगतांना, विवेकाने ती सुसह्य होतात याकडे लक्ष द्या.  तुम्ही एखाद्याला मदत केली, व त्याची दुखे कमी केलीत म्हणजे काय झाले ? त्याच्या प्रारब्धातील सत्कृत्यामुळे तुम्हाला तशी बुद्धी झाली, व त्याची दुखे कमी झाली, व त्याचे वेळी तुमच्या यादीत सत्कृत्याची भर पडली.  संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण आणि ज्योतिष शास्त्र.  राहू  हा ग्रह क्रियमाण कर्माचा कारक असून, शनि  हा ग्रह संचिताचा कारक आहे.  केतू हा ग्रह प्रारब्धाचा कारक असून याचे फळ हे टाळता येत नाही.  म्हणजेच केतू हा आपले भोग हे माणसाला भोगायलाच लावतो. परमेश्वराने सृष्टीची रचना केल्यानंतर, मनुष्याला कर्म फळ टाळण्यासाठी प्रायाश्चित्य म्हणून सुधारण्याची एक संधी दिली आहे.  हे प्रायाश्चित्य कर्म म्हणजे, दैवी उपासना होय.  याव्दारे मनुष्य जवळ जवळ 95 टक्के  कर्म भोग टाळू शकतो.  फक्त 5 टक्के कर्म भोगच माणसाला टाळता येत नाहीत.  यालाच केतू ग्रहाचे प्रारब्ध योग  म्हणतात.  आमच्या वेदाचार्यांनी, दैवी उपासना दोन प्रकारे सांगितली आहे.   सदाचरणाने,  दानधर्म करणे, भुकेल्यांना अन्नदान करणे, गरजूंना मदत करणे, दुखी आणि पीडित लोकांची सेवा करणे, व्यसनांपासून दूर राहणे, हिंसा न करणे वगैरे.   प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार अनिष्ट अथवा बलवान राशी, ग्रह, नक्षत्रानुसार देवतांची उपासना.  या उपासनेव्दारे आत्मशक्ती जागी होते, आणि त्याव्दारे मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा लाभ होतो.  या उपासनेला सदाचरणाची जोड लाभली तर हा एकप्रकारचा, मणिकांचन  योगच समजावा.  अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपन आमच्या channel ला subscribe करा, आणि video ला लाईक करा, आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.  

Comments

Popular posts from this blog

सर्वात मोठे लोक आणि त्यांचे गुपित जीवन — ऐतिहासिक व्यक्तींचे रहस्य, त्यांचे साधन, साधना, आणि जीवनशैली।

पुराणातील १० शक्तिशाली मंत्र आणि त्यांचा प्रभाव — घर, आयुष्य, आणि मानसिक उर्जा बदलणारे मंत्र।

धन आणि संपत्ती वाढवण्याचे ५ रहस्यमय उपाय — वास्तू, ग्रह, आणि कर्माचे योग।